Rashmi Thackeray Health | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची केली विचारपूस

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे &nbsp;यांच्या पत्नी <a href="https://marathi.abplive.com/topic/rashmi-thackeray">रश्मी ठाकरेंना</a> काही दिवसांपूर्वी <a href="https://marathi.abplive.com/topic/corona-cases">कोरोनाची</a> लागण झाली होती. सध्या रश्मी ठाकरेंवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी <a href="https://marathi.abplive.com/topic/uddhav-thackeray">मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना</a> फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. त्याचसोबत त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.&nbsp;</p> <p style="text-align: justify;">दरम्याना काही दिवसांपूर्वी <a href="https://marathi.abplive.com/topic/rashmi-thackeray">रश्मी ठाकरेंना</a> मुंबईतील रुटीन चेक अपसाठी रिलाएन्स एच एन रुग्णालयात आणण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.&nbsp; मात्र काही दिवसांपासून त्यांना खोकल्याचा त्रास होत असल्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. मुफी यांच्या देखरेखीत रश्मी ठाकरेंवर उपचार सुरु आहे.&nbsp;</p> <p style="text-align: justify;">राज्यात गेल्या काही दिवसांपासून <a href="https://marathi.abplive.com/topic/corona-cases">कोरोना</a> रुग्णांची संख्या वाढत आहे. रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत 11 मार्चला कोवॅक्सिन लस घेतली होती. अशातच आता<br />&nbsp;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे &nbsp;यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला होता.&nbsp;</p> <p style="text-align: justify;">राज्याच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार बुधवारी दिवसभरात संपूर्ण राज्यात तब्बल 39 हजार 544 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ज्यामुळं राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28,12, 980 वर पोहोचला आहे.&nbsp;<strong><a href="https://ift.tt/3co2fIR" rel="nofollow">कोरोना</a>&nbsp;</strong>रुग्णसंख्येत धडकी भरवणाऱ्या प्रमाणात वाढ होताना दिसत असतानाच बुधवारी तब्बल 2400727 रुग्णांनी या संसर्गावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून रजा देण्यात आली. परिणामी राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता &nbsp;85.34% झालं आहे. कोरोना रुग्णसंख्येतील हा चढ- उतार सुरु असतानाच आजच्या दिवशी कोरोनामुळं दगावणाऱ्यांचा आकडाही चिंता वाढवणारा ठरला. दिवसभरात 227 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. परिणामी आरोग्य विभाग अधिकच सतर्क झाला आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pm-narendra-modi-calls-cm-uddhav-thackeray-inquires-about-wife-rashmi-thackeray-health-980364

Post a Comment

0 Comments