Breaking News LIVE : जाणून घ्या दिवसभराच्या बातम्या एका क्लिकवर... 

<p><strong>झोपडपट्टी पुनर्वसनच्या नावाखाली बँकांचे तब्बल 40 हजार कोटींचे कर्ज विकासकांनी थकवलं</strong><br />दाटीवाटीच्या मुंबई शहरात वसलेल्या झोपडपट्टीला मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणली. मात्र या योजनेची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी आढावा बैठक पार पडली. या बैठकीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्याचे मुख्य सचिव, म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.&nbsp;</p> <p>मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकासाचे जे प्रकल्प रखडलेले आहेत, त्या विकासकांनी विविध बॅंकांकडूनजवळपास 40 हजार कोटी कर्ज घेतलेलं आहे. मात्र ज्या कारणासाठी हे कर्ज घेतलेलं होत त्याचा उपयोग या प्रकल्पासाठी करण्यात आला नसून इतर ठिकाणी हे पैसे वापरले असल्याचं ही निदर्शनास आलं असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. या सर्व विकासकांवर कारवाई केली जाणार आहे.</p> <p><strong>NEET परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षा ठरल्या तारखेलाच होणार</strong><br />राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET) 2021 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी हजारो विद्यार्थी करत होते. मात्र, राष्ट्रीय चाचणी एजन्सीने शुक्रवारी स्पष्ट केलं की NEET पुढे ढकलली जाणार नाही. परीक्षा रविवारी (12 सप्टेंबर) ठरल्याप्रमाणे आयोजित केली जाईल. एनटीएचे डीजी विनीत जोशी म्हणाले, की "सीबीएसई बोर्डाच्या (CBSE board) परीक्षांशी नीटचा संबंध येत नाही. त्यामुळे परीक्षा 12 सप्टेंबर रोजी ठरल्यानुसार आयोजित केली जाईल." NEET मध्ये प्रयत्न वाढवण्याबाबत NTA अधिकारी म्हणाले, की &ldquo;NEET मध्ये अनेक प्रयत्नांबाबत निर्णय आरोग्य मंत्रालय घेईल. वैद्यकीय प्रवेशाचे प्रयत्न वाढवण्याची कोणतीही योजना नाही &rdquo;</p> <p>याआधी, एका अग्रगण्य दैनिकाशी बोलताना, शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी असेही ठामपणे सांगितले आहे की NEET-UG तारखांमध्ये बदल केल्याने लॉजिस्टिक समस्यांमुळे परीक्षा कमीतकमी 2 महिने पुढे ढकलली जाईल आणि इतर अनिश्चिततेमुळे विलंब होऊ शकतो.</p> <p><strong>तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाचे शानदार प्रदर्शन; रोहितचं अर्धशतक, पुजारा शतकाच्या उंबरठ्यावर</strong><br />&nbsp;भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या &nbsp;हेंडिग्ले येथे तिसऱ्या कसोटीच्या &nbsp;तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस &nbsp;२ बाद 215 धावांपर्यंत भारताने मजल मारली. &nbsp;वातावरण खराब असल्याने आजचा सामना वेळेपूर्वीच थांबवण्यात आला. &nbsp;चेतेश्वर पुजारा 15 चौकारांसह 91 &nbsp;तर विराट कोहली 6 चौकारांसह &nbsp;45 धावांवर नाबाद होते.&nbsp;</p> <p>भारताची दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर केएल राहुलची &nbsp;क्रेग ओव्हर्टनने आठ धावांवर &nbsp;तंबूचा मार्ग दाखवला. तर रोहित शर्माने 156 बॉलमध्ये &nbsp;59 धावा केल्या. &nbsp;ओली बॉबिन्सन रोहित तंबुत माघारी धाडले. रोहितनंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. त्याने पुजारासोबत &nbsp;99 धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर पुजाराचे अर्धशतक झाले.</p>

from maharashtra https://ift.tt/3By0pjB
via IFTTT

Post a Comment

0 Comments