<p style="text-align: justify;"><strong>Corona vaccination: देशातील 25 टक्के लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस, 2 ऑक्टोबरला मुलांसाठीची लस येण्याची शक्यता</strong></p> <p style="text-align: justify;">Corona vaccination: कोरोना व्हायरसच्या (Corona virus) तिसऱ्या लाटेची (Third wave) शक्यता व्यक्त केली जात असताना भारतात आता कोरोना लसीकरणानं चांगलाच जोर धरला आहे. भारतात एकूण लोकसंख्येच्या जवळपास 25 टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण डोस दिलेल्या लोकांची संख्या 88 कोटींवर पोहोचली आहे. दुसरीकडे कोरोनाची आणखी एक लस 2 ऑक्टोबर रोजी मिळेल अशी शक्यता आहे. देशातील चार मोठ्या राज्यांपैकी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातनं 6 कोटींहून अधिक लोकांना लस दिली आहे. यात गुजरात (40 टक्के), मध्य प्रदेश (27 टक्के) आणि महाराष्ट्र (26 टक्के) लसीकरण झालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये 13.34 टक्के युवकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. </p> <p style="text-align: justify;"><strong>Mumbai School : शाळांची घंटा वाजणार! मुंबईतील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु</strong><br /> <br />Mumbai School Reopening : तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेल्या मुंबईतील शाळा आता 4 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील महानगरपालिका शाळा, खाजगी व्यवस्थापन, इतर सर्व मंडळाच्या शाळांना आठवी ते बारावी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून आयुक्तांपुढे मांडण्यात आला होता. त्याला बीएमसी आयुक्त इकबाल सिंग चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांची मंजुरी मिळाली आहे. मुंबई परिक्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या एकूण शाळा 2553 आहेत आणि त्यात एकूण विद्यार्थी 5, 13, 502 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.</p> <p style="text-align: justify;"><strong>शेतकरी संकटात! राज ठाकरे म्हणाले, ही आणीबाणीची वेळ, ओला दुष्काळ जाहीर करा</strong><br /> <br />Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain Update) राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. गुलाबी वादळामुळं झालेल्या पावसानं काटे मात्र शेतकऱ्यांच्या अंगाला रुतले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्रक काढत शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी सरकारकडे केली आहे. राज ठाकरे यांनी पत्रकात म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात, पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे, असं राज ठाकरे म्हणाले. </p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-september-30-2021-maharashtra-rain-update-political-news-1005630
0 Comments