Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

<p class="article-title " style="text-align: justify;"><strong><a href="https://marathi.abplive.com/news/maharashtra/tuljapur-navratri-2021-rules-for-navratri-festival-announced-at-tulja-bhavani-temple-and-tuljapur-1005764">तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर; देवीच्या दर्शनासाठी जाताय? 'हे' नक्की वाचा</a></strong></p> <p class="qrShPb kno-ecr-pt PZPZlf mfMhoc" style="text-align: justify;" data-dtype="d3ifr" data-local-attribute="d3bn" data-attrid="title" data-ved="2ahUKEwiPpIzOjajzAhWWgtgFHcPABL4Q3B0oAHoECGQQAQ">उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/topic/tuljapur"><strong>तुळजापूर</strong></a>&nbsp;(Tuljapur) मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी शारदीय नवरात्र उत्सव कसा साजरा करावा याबाबत लेखी आदेश काढले आहेत. शारदीय नवरात्रोत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून या उत्सव काळात दररोज केवळ 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे.&nbsp;</p> <p style="text-align: justify;">भाविकांना मंदिरात प्रवेश असेल मात्र त्यांना अभिषेक इतर विधींना परवानगी नाही. देवीचे महंत, सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत देवीचे कुलाचार विधी संपन्न होणार आहेत. याबाबतचा जिल्हाधिकारी यांचा आदेश माहिती आणि जनसंपर्क कार्यालयानं कळविला आहे.</p> <p style="text-align: justify;">परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासांच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आली आहे. यात्रा काळात कोरोना नियमांचे पालन बंधनकारक असून हॉटेल, दुकानात असलेल्या कर्मचारी यांचे 2 डोस झालेले असून त्याची यादी प्रशासनाला कळवावी लागणार आहे.</p> <p style="text-align: justify;">गर्दी होऊ नये आणि कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी दररोज पहाटे 4 ते रात्री 10 या वेळेत फक्त 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. तुळजापूर येथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्यात 15 हजार भाविकांची प्रवेश मर्यादा घातल्याने आगामी काळात गर्दीवर नियंत्रण आणणे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान असणार आहे.&nbsp;</p> <p class="article-title " style="text-align: justify;"><strong><a href="https://ift.tt/2WyP6sw मध्ये घडलेल्या मिरजेच्या गणेशोत्सव दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता, सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल</a></strong></p> <p style="text-align: justify;">2009 मध्ये मिरजेत घडलेल्या गणेशोत्सव दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयानं (Sangli District Sessions Court) हा निकाल दिला आहे. 2009 मध्ये घडलेल्या मिरजमधील जातीय दंगलीनंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय गणितं मोठ्या प्रमाणावर बदललेली दिसतात. या दंगलीचा त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील परिणाम झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन माजी महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेना जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, शहर प्रमुख विकास सुर्यवंशी यांच्यासह 106 जणांची यामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.</p> <p style="text-align: justify;">मिरज शहरामध्ये 2009 दरम्यान झालेल्या जातीय दंगली प्रकरणी 106 जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान ही जातीय दंगली घडली होती. ज्यानंतर या दंगलीचे पडसाद त्यावेळच्या विधानसभा निवडणूकीतही उमटले होते. सध्याच्या आघाडी सरकारकडून या दंगलीचे खटले बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आल्यानं न्यायालयानं हा खटला निकाली काढत, निर्दोष मुक्तता केली आहे.</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-october-1-2021-maharashtra-rain-update-political-news-1005767

Post a Comment

0 Comments