नागरिकांना एका OTPवर मिळणार लोकसेवांची माहिती,अहमदनगर पोलिसांकडून राज्यातील पहिलाच उपक्रम

<p style="text-align: justify;"><strong>अहमदनगर :</strong> अहमदनगर पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील नागरिकांसाठी 'ई -टपाल' प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या &nbsp;'ई -टपाल' प्रणालीद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना आपला अर्जाची नेमकी स्थिती कळणार आहे. आपला अर्ज नेमका कोणत्या टेबलवर आहे, कोणत्या अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज आहे याची माहिती आपल्या मोबाईलवर मिळणार आहे. या प्रणालीद्वारे आपला अर्ज किती दिवसांपासून प्रलंबित आहे हेही यातून समजणार आहे. त्यामुळे दप्तर दिरंगाईलाही आळा बसणार आहे. सोबतच नागरिकांना वारंवार पोलीस कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे होणारा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार नाही. राज्यात प्रथमच पोलीस विभागात अशी प्रणाली अहमदनगर जिल्ह्यात अंमलात आणली गेली आहे.</p> <p style="text-align: justify;">यासाठी अहमदनगर जिल्हा पोलीस विभागाच्या <strong><a href="https://ift.tt/3AHsdm7> या वेबसाईटवर गेल्यानंतर नागरिकांना आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे , त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल तो टाकल्यानंतर आपल्या अर्जाची नेमकी काय स्थिती आहे ती नागरिकांना दिसणार आहे. नागरिकांसोबतच पोलीस दलाला देखील याचा फायदा होणार आहे. नागरिकांकडून येणारे अर्ज नेमक्या कोणत्या अधिकाऱ्याकडे प्रलंबित आहे , किती दिवसांपासून प्रलंबित आहे हे समजणार आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर देखील जबाबदारी निश्चिती होणार आहे.&nbsp;</p> <p style="text-align: justify;"><strong>या अर्जाची मिळणार माहिती</strong><br />1) सशुल्क बंदोबस्त<br />2) चारित्र्य पडताळणी&nbsp;<br />3) पेट्रोल पंप&nbsp;<br />4) सुरक्षा रक्षक एजन्सी<br />5) शस्त्र परवाना<br />6)स्फोटक परवाना<br />7)वाईन/ परमिट रूम<br /><br />यासह इतर परवान्यांबाबत पोलीस विभागाकडे अर्ज केल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती नागरिकांना मिळणार आहे.<br /><br />अहमदनगर पोलीस विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. या 'ई- टपाल' प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ आणि पैसे वाचणार आहे तसाच फायदा पोलीस दलाचा देखील होणार आहे.अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असल्याने एखाद्या ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यातील एक टपाल जिल्हा कार्यालयात पाठवायचे असेल तर एक कर्मचारी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यासाठी त्यांचा त्या दिवसाचा पगार, जाण्या-येण्याचा खर्च , जेवण भत्ता याची बचत होणार आहे. महिनाभरात या प्रणालीमुळे शासनाचे 10 लाख रुपये वाचू शकतात असं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ABP माझाशी बोलताना सांगितले.</p> <p style="text-align: justify;">सोबतच मनोज पाटील यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने टपाल येतात त्याचा हिशोब ठेवणं खूपच गुंतागुंतीचे होते.मात्र, तंत्रज्ञानाचा वापर करून आता या अर्ज आणि टपालांचा हिशोब ठेवणं फार सोपं झालं आहे. सोबतच लोकसेवा हक्क अधिनियमाचं यामुळे पालन केलं जाऊ शकतं. आतापर्यंत या ई - टपाल प्रणालीचा वापर करून 33 हजार 275 अर्ज अहमदनगर पोलीस दलाकडे प्राप्त झाले होते त्यापैकी केवळ 1 प्रकरण प्रलंबित असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.<br /><br />ही प्रणाली सुरू करण्यासाठी कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी अर्थसहाय्य केल्याचं मनोज पाटील यांनी सांगितले. हा राज्यासाठी पथदर्शी उपक्रम असून याचा वापर सर्वच सरकारी कार्यालयांनी केला तर निश्चितच नागरिकांसह शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होऊ शकतो असं मतं पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केलं आहे.</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/citizens-will-get-public-service-information-on-one-otp-first-initiative-in-the-maharashtra-by-ahmednagar-police-1028786

Post a Comment

0 Comments