Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

<p class="article-title "><strong>Weather : उत्तर भारतात पावसाची शक्यता, तर महाराष्ट्रात तापमानात झालेल्या वाढीमुळं उकाडा वाढला</strong></p> <p><strong>India Weather :</strong>&nbsp;सध्या देशाच्या राजधानीसह उत्तर भारतातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही उन्हाचा चटका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण असल्याचे दिसत आहे.</p> <p><a title="महाराष्ट्र" href="https://ift.tt/u3gcN04" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a>ात चंद्रपूर, अहनदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. याठिकाणी ताापमानाचा पारा 37 अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. तापमान वढल्याने उकाडा वाढला आहे. काही ठिकाणी ढगाळ वतावरण झाल्याने सोमवारी काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.</p> <p class="article-title "><strong>नेत्यांच्या विरोधातील फौजदारी खटल्यांची माहिती सादर करा; हायकोर्टाचे राज्य सरकारला</strong></p> <p class="article-title ">&nbsp;</p> <p><strong>मुंबई</strong> :&nbsp;राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित असलेल्या आणि हायकोर्टानं स्थगिती दिलेल्या खटल्यांची तपशीलवार माहिती द्या, असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.&nbsp;सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आजी-माजी सर्व खासदार व आमदारांच्या विरोधातील प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांच्या प्रश्नावर हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं स्युमोटो याचिका दाखल केली आहे. सोमवारपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. राज्यातील चार विभागातील कनिष्ठ न्यायालयात लोकप्रतिनिधींविरोधात 51 खटले प्रलंबित आहेत.&nbsp; त्यात &nbsp;प्रमुख्याने मुंबई 19, नागपूर 9, औरंगाबाद 21, गोवा 2 आदींचा समोवश आहे.&nbsp;</p> <p><strong>राज्यातील जिल्हा पातळीवर कनिष्ठ न्यायालयातील प्रलंबित खटले<br /></strong><br />मुंबई 201 ,नागपुर 126 औरंगाबाद 157 गोवा 20</p> <p>जिल्हानिहाय सर्वाधिक खटले अमरावती &nbsp;45 परभणी 40 तर सर्वात कमी खटले गडचिरोली 0, लातूर 1 जिल्ह्यामध्ये आहेत.</p> <p class="article-title "><strong>Russia Ukraine War : मोदीजी आम्हाला वाचवा नाहीतर आमचा जीव जाईल, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची आर्त विनवणी</strong></p> <p class="article-title ">Russia Ukraine Conflict :&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/topic/russia-ukraine-war">&nbsp;युक्रेन-रशियामध्ये (Ukraine-Russia War)</a>युद्ध सुरू आहे,&nbsp; युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. युक्रेनच्या सुमी शहरात तब्बल 900 भारतीय विद्यार्थी अडकून पडलेत. या शहरात दर तासाला रशियाकडून बॉम्बहल्ले होत असल्यानं विद्यार्थी धास्तावले आहेत. या विद्यार्थ्यांना अन्न तर सोडाच, पण साधं पाणीही &nbsp;प्यायला नसल्यानं रस्त्यावर पडलेला बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.&nbsp; त्यामुळं हे विद्यार्थी अक्षरशः रडकुंडीला आले असून मोदीजी आम्हाला वाचवा, अन्यथा आमचा जीव जाईल, अशी आर्त विनवणी &nbsp;युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.&nbsp;</p>

from maharashtra https://ift.tt/RvYVPqf
via IFTTT

Post a Comment

0 Comments