<p>आजपासून ग्रामपंचायतींचा धुरळा उडणार आहे. 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. सगळेच राजकीय पक्ष स्वबळावर लढत असल्यानं रंगत वाढणार आहे. गावपातळीवर पक्षवाढीसाठी महाविकास आघाडीतही लढाई पाहयला मिळणार आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-gram-panchayat-election-candidate-registration-form-pankaj-kshirsagar-841743
0 Comments