मुख्यमंत्री ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात एकाच ठिकाणी पाहणीला, हे कसं घडलं, वाचा इनसाईड स्टोरी

<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर :</strong> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. दोघांनीही कोल्हापुरातील विविध पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. &nbsp;जिथं मुख्यमंत्री येणार होते तिथेच फडणवीस देखील पोहोचले. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघेही एकाच ठिकाणी शाहुपुरीत भेटले. मात्र हे &nbsp;दोघं एकत्र भेटण्याआधी काय घडलं? याबाबतची ही इनसाईड स्टोरी.</p> <p style="text-align: justify;">त्याचं झालं असं, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या ठिकाणी होते. &nbsp;याची माहिती उद्धव ठाकरेंना मिळताच देवेंद्र फडणवीसांना तिकडेच थांबण्याचा निरोप पाठवला गेला. &nbsp;शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंचा निरोप पाठवला. &nbsp;&ldquo;वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्र पाहणी करूया&rdquo; असा फोन उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना गेला. &nbsp;त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य करून शाहुपुरीतच थांबण्याचा निर्णय घेतला. &nbsp;त्यानंतर एकत्र पाहणी झाली.</p> <p style="text-align: justify;">&nbsp;पूरग्रस्तांना तातडीची मदत तर दिलीच पाहिजे, मात्र यावर कायमस्वरुपी उपाय काढावा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/cm-uddhav-thackeray-and-lop-devendra-fadnavis-in-kolhapur-flood-visit-996684

Post a Comment

0 Comments