Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

<p><strong>हिवाळी अधिवेशनाचा अखेचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची उत्सुकता शिगेला</strong></p> <p>आजचा दिवस विविध राजकीय घडामोडींनी गाजण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्धार आहे. अध्यक्षपद निवडणुकीबाबत राज्यपालांना पाठवलेल्या पत्रासंदर्भात सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर न आल्यास निवडणूक घेण्यावर सरकार ठाम आहे. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय. तिकडे कोकणात वातावरण तापलंय. शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता आहे.&nbsp;</p> <p>राज्यपालांनी उत्तर दिलं नाही तर सहमती आहे, असं समजून निवडणूक घेण्याची तयारी सत्ताधारी महाविकास आघाडीनं केली आहे. मात्र, तसं केल्यास पुढचे परिणाम काय होतील याचीही चाचपणी सत्ताधारी करत असल्याचं कळतं. त्यामुळे आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडीवरून काय घडामोडी घडत आहेत याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्हालाही मतदानाचा अधिकार द्या, अशी मागणी 12 निलंबित भाजप आमदारांनी राज्यपालांकडे केली आहे. आमचा मतदानाचा हक्का हिरावला जातोय. मतदान करणं संवैधानिक अधिकार आहे. त्यामुळे मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी विनंती राज्यपालांकडे केली आहे.</p> <p class="article-title "><strong>अटकपूर्व जामीनासाठी नितेश राणेंची न्यायालयात धाव; आज सुनावणी, अटक टळणार?</strong></p> <p class="article-title ">संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे.&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/topic/nilesh-rane">भाजप आमदार नितेश राणे</a>&nbsp;(Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज उभी करण्यात आली आहे. नितेश राणे यांच्यातर्फे बाजू मांडताना अॅड. संग्राम देसाई हे युक्तिवाद करतील. तर अॅड राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत ही कायदेतज्ञ टीम सहकार्याला असेल. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड प्रदीप घरत आणि अॅड भूषण साळवी हे राज्य सरकारतर्फे ते युक्तिवाद करतील. आज दुपारी 2.45 वाजता जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु होईल. दरम्यान&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/topic/Narayan-rane">केंद्रीय मंत्री नारायण राणे</a>&nbsp;(Narayan Rane) आपला नागपूर दौरा अर्धवट सोडून कणकवलीला परतल्यानं चर्चांना आणखी उधाण आलं आहे.&nbsp;</p> <p class="article-title ">&nbsp;</p>

from maharashtra https://ift.tt/3FG2JaI
via IFTTT

Post a Comment

0 Comments