Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

<h4 style="text-align: justify;"><strong>Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...</strong></h4> <h4 style="text-align: justify;"><a href="https://ift.tt/3mEJNSd Update : देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ? दिल्लीत 496, तर मुंबईत 1377 दैनंदिन कोरोना रुग्ण</a></h4> <p style="text-align: justify;"><strong>Coronavirus Update :</strong>&nbsp;देशात पुन्हा एकदा&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/topic/coronavirus-update"><strong>कोरोनाचा प्रादुर्भाव</strong></a>&nbsp;(Covid-19 Update) वाढताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशातील मंदावलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबतच&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/topic/Omicron"><strong>ओमायक्रॉनबाधितांच्या (Omicron) संख्येतही झपाट्यानं वाढ</strong></a>&nbsp;होत आहे. देशभरातील &nbsp;21 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड-19 चा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या 650 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद महाराष्ट्र आणि दिल्लीत झाली आहे. &nbsp;</p> <p style="text-align: justify;"><strong>देशाच्या राजधानीत&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/topic/coronavirus-update">कोरोनाचा प्रादुर्भाव</a>&nbsp;</strong></p> <p style="text-align: justify;">दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत 496 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अनेक महिन्यांनी दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळालं. तसेच कोरोना संसर्गाच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी राजधानी दिल्लीमध्ये 331 रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, आता हा रेकॉर्डही मोडीत निघाला असून दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या दिल्लीतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1612 वर पोहोचली आहे.&nbsp;</p> <div style="text-align: justify;" data-id="Ey6pm4zmEj6F"> <div class="orp-player-wrapper orp-aspectRateFixed orp-player-ipm orp-player-ipm-hidden orp-force-hide-player"><strong>दिल्लीत कोरोना 'आउट ऑफ कंट्रोल'</strong></div> </div> <p style="text-align: justify;">झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळं दिल्लीमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. सध्या राजधानीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे दिल्लीमध्ये रात्री दहा वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सिनेमा हॉल, बँक्वेट हॉल, स्पा बंद करण्यात आले आहेत. रेस्टॉरंटही 50 टक्के उपस्थितीसह सुरु आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी आपल्या संबोधनात म्हटलं की, दिल्लीतील कोरोना स्थितीवर लक्ष असून बदलणारी स्थितीचा आढावा घेऊन निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. सध्या तरी राजधानीमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. चिंतेची बाब म्हणजे, सध्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.&nbsp;</p> <p class="article-title " style="text-align: justify;"><strong><a href="https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-deputy-cm-ajit-pawar-criticized-bjp-on-caretaker-chief-minister-demand-1021624">काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाबद्दल अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले...</a></strong></p> <p style="text-align: justify;"><strong>Ajit Pawar :</strong>&nbsp;विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. अधिवेशन काळात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडे सोपवायवला हवी होती, असेही विरोधकांनी म्हटले होते. विरोधकांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. चार्ज कोणाला द्यायचा हे आम्ही ठरवू बाहेरच्या लोकांनी नाक खुपसू नये असे अजित पवार यांनी म्हटले.&nbsp;</p> <p style="text-align: justify;">विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले की, या अधिवेशानात तीन विधेयके मागे घेण्यात आली आहेत. अधिवेशनाचे कामकाज व्यवस्थित पार पाडले असून शक्ती विधेयकालाही या अधिवेशनात मंजुरी देण्यात आली आहे. इम्पिरीकल डेटा संकलित करण्यासाठी 435 कोटी मंजूर करण्यात आल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.&nbsp;</p> <p style="text-align: justify;">विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ठरलेल्या निधीपेक्षा अधिक निधी सरकारने दिला आहे. विदर्भाला 3 टक्के अधिक रक्कम दिली असल्याचे त्यांनी सांगितले.&nbsp;</p> <p>&nbsp;</p>

from maharashtra https://ift.tt/3mAd1l5
via IFTTT

Post a Comment

0 Comments