<h4 style="text-align: justify;"><strong>Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...</strong></h4> <p class="article-title " style="text-align: justify;"><strong><a href="https://marathi.abplive.com/news/mumbai/shiv-sena-mp-sanjay-raut-allegation-on-bjp-pm-modi-new-year-in-saamana-rokhthok-column-1022556">पंतप्रधानांनी 12 कोटींची मर्सिडीज बेन्झ घेतली, आतातरी फकीर म्हणून घेऊ नये : संजय राऊत </a></strong></p> <p style="text-align: justify;">शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना (Saamana)च्या रोखठोक (Rokhthok) कॉलममधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 2021 साल सरले, पण 2022 या वर्षात आशेची किरणे दिसतील काय? असा सवाल करत राऊत यांनी पंतप्रधानांनी खरेदी केलेल्या गाडीवरुन देखील टीका केली आहे. राऊत म्हणाले की, महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. पंतप्रधान मोदींसाठी 12 कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी आता खरेदी केली. त्यातून सरकारची भ्रमंती चालली आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. </p> <p style="text-align: justify;">खासदार राऊत यांनी लिहिलं आहे की, 2021 अनेक जळमटे तशीच ठेवून सरले आहे. तेच निर्बंध, तेच सर्व प्रश्न 2022 च्या झोळीत टाकून 2021 सरले तेव्हा लोकांनी फार मोठा जल्लोष केला असे चित्र दिसले नाही. 2020 मावळताना 2021 वर्षाला गोंधळ व अराजकाची भेट दिली. 2021 ने 2022 ला तोच नजराणा पुढे दिला. मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपले पंतप्रधान मोदी हे जगासमोर गंगास्नान करतात. म्हणून देशातल्या लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा कोरोना वाहून गेला नाही. तो कायम आहे. 28 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या 12 कोटी रुपयांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये, असं राऊतांनी म्हटलं आहे. </p> <p style="text-align: justify;"><strong>गांधी घराण्याच्या साहसाचं केलं कौतुक</strong><br />राऊत पुढं लिहितात, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वदेशीचा उपक्रम ज्या पंतप्रधानांनी सुरू केले, तेच परदेशी बनवटीच्या गाड्या वापरतात. पंडित नेहरू यांनी सदैव हिंदुस्थानी बनावटीची अॅम्बेसेडर गाडी वापरली. फाळणीनंतर त्यांच्या जीवितास सर्वांत जास्त धोका होता. महात्मा गांधी तर बेडरपणे भ्याड खुनी हल्ल्यास सामोरे गेले. जिवास प्रचंड धोका असतानाही इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख रक्षक बदलले नाहीत. तामीळनाडूच्या गर्दीत राजीव गांधी गेले व लिट्टेकडून मारले गेले. हे त्यांचे साहस होय. त्यांनी असे साहस करायला नकोच होते, पण केले. पंतप्रधान मोदींची 12 कोटींची बुलेटप्रूफ, बॉम्बप्रूफ कार म्हणून महत्त्वाची आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. </p> <div style="text-align: justify;" data-id="Ey6pm4zmEj6F"> <div class="orp-player-wrapper orp-aspectRateFixed orp-player-ipm orp-player-ipm-hidden orp-force-hide-player"><strong>नवे वर्ष कोणत्या आशांची किरणे दाखवणार?</strong></div> </div> <div class="section uk-padding-small uk-flex uk-flex-center uk-flex-middle"> <div class="uk-text-center" style="text-align: justify;">राऊत यांनी म्हटलं आहे की, राजकारण्यांची विश्वासार्हता रसातळाला नेणारे वर्ष मावळले म्हणत नवे वर्ष कोणत्या आशांची किरणे दाखवणार? देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कर्ज अधिक या स्थितीत आपण चाललो आहोत. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करणे आता अशक्यप्राय बनले आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले ते नेहरूंच्या धोरणांमुळेच असे खापर फोडून मोदी व सरकार 12 कोटींच्या नव्या मर्सिडीज बेन्झ गाडीत विराजमान झाले आहेत. मोदी यांचे वृत्तवाहिन्यांवरील रोजचे 'दर्शन' पाहिले तर तेच स्वतः भ्रमंतीसाठी वेळ आणि पेट्रोल किती खर्च करीत आहेत ते लक्षात येते. मंत्र्यांच्या मोटारी, उद्योगपती, बड्या नेत्यांची चार्टर विमाने उडतच आहेत आणि लोकांना मात्र उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे, झाले ते पुरे झाले. 2022 सालात तरी शहाणे व्हा! नेते व मंत्री रोज खोटे बोलतात. त्यांचे इतके मनावर घेऊ नका. कारण शेवटी चुकीच्या माणसांना अंबारीत बसविण्याचे कार्य तुमच्याच हातून घडत असावे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. </div> <div class="uk-text-center" style="text-align: justify;"> </div> <div class="uk-text-center" style="text-align: justify;"><a href="https://ift.tt/31g6t3u Train MegaBlock : मध्य मार्गावर 24 तासांचा जम्बोब्लॉक, हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक</strong></a></div> <div class="uk-text-center" style="text-align: justify;"> </div> <div class="uk-text-center" style="text-align: justify;">रविवारी दोन जानेवारी 2022 रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रल्वेचा मेगा ब्लॉक हा 24 तासांचा असणार आहे. ठाणे-दिवा मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. तर, हार्बर मार्गावरही दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. </div> <div class="uk-text-center" style="text-align: justify;"> <p style="text-align: justify;">2 जानेवारी पासून रेल्वे ठाणे-दिवा मार्गावर 24 तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे. रविवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून ते सोमवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. एक जानेवारीला रात्री 11.43 पासून ते दोन जानेवारीला रात्री 11.43 पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप आणि जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थाबंणार नाहीत. पुढे मुलंड स्थानकावर अप धीम्याा मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. त्यामुळे या सर्व लोकल नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशीराने पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या, अर्ध जलद सेवा मुलुंडहून दोन जानेवारी रोजी 5.05 पासून ते 3 जानेवारी मध्यरात्री 1.15 पर्यंत मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. या लोकल कळवा, मुंब्रा, कोपर व ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. </p> </div> </div>
from maharashtra https://ift.tt/3mQPnAZ
via IFTTT
0 Comments