Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर..

<p><strong>Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...</strong></p> <p><strong>Maharashtra School : सोमवारपासून शाळा सुरु? आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता</strong><br />&nbsp;<br />Maharashtra School Reopen : राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत असताना आता आज याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. &nbsp;शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण विभागानं मुख्यमंत्री ठाकरेंना काल प्रस्ताव पाठवलाय. येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्यात याव्यात तसंच शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात यावे असं या अहवालात नमूद करण्यात आलंय. मंत्री आदित्य ठाकरेंनी कोविड टास्क फोर्सशी चर्चा करुन शाळा सुरू करण्याबाबत अनुकुलता दर्शवली आहे. त्यामुळं सोमवारपासून शाळा सुरू होणार का?याकडे आता लक्ष लागून आहे.&nbsp;</p> <p>शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु करण्यात याव्यात असं या प्रस्तावात म्हटलं आहे.&nbsp;</p> <p><strong>Dhule : नगरपंचायत &nbsp;निवडणुकीच्या निकालानंतर साक्रीत गालबोट; वादात महिलेचा मृत्यू</strong><br />&nbsp;<br />Dhule Sakri Latest Update : साक्री नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. निकालानंतर भाजप कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. यावेळी शिवसेनेचे गोटू जगताप हे आपल्या मोटरसायकलने जात असताना त्यांच्यात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला या वादाचे पर्यावसन काही वेळात हाणामारीत झाले.</p> <p>दरम्यान हा वाद सुरू असताना गोटू जगताप यांच्या बहीण मोहिनी नितीन जाधव या वाद सोडविण्यासाठी आल्या होत्या. यावेळी मोहिनी जाधव त्या खाली पडल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. गोटू जगताप यांच्या मातोश्री ताराबाई जगताप या निवडणुकीत पराभूत झाल्याने &nbsp;त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.&nbsp;</p> <p>भावाला मारहाण होत असताना मोहिनी जाधव मध्यस्थी करण्यासाठी पुढे आल्या असताना त्यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान दोषींवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. मात्र मोहिनी जाधव यांच्या मृत्यू मागील कारण अद्याप समजू शकले नाही.&nbsp;</p> <p><strong>Covid19 Third Wave : दिलासादायक! भारतात दैनंदिन कोरोनारुग्ण संख्या 4 लाखांच्या पार जाणार नाही : शास्त्रज्ञांचा अंदाज</strong></p> <p><strong><br />Covid19 Third Wave :</strong>&nbsp;अलिकडे वाढता&nbsp;<strong><a href="https://marathi.abplive.com/topic/covid19">कोरोना</a></strong>चा धोका पाहता&nbsp;<strong><a href="https://marathi.abplive.com/topic/third-wave">भारता</a></strong>तील दैनंदिन&nbsp;<strong><a href="https://marathi.abplive.com/topic/omicron">रुग्णसंख्या</a></strong>ही दिवसागणिक वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात दैनंदिन&nbsp;<strong><a href="https://marathi.abplive.com/topic/third-wave">कोरोनारुग्णांची संख्या</a></strong>&nbsp;4 लाखांच्या पार जाण्याची शक्यता नाही, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या विश्लेषणानुसार, मुंबई आणि दिल्लीमध्ये जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच कोरोनारुग्णांचा उच्चांक गाठला आहे, तर बेंगळुरू 22 जानेवारी रोजी कोरोनारुग्णांचा उच्चांक गाठेल.</p> <p>शास्त्रज्ञांना कोरोनाच्या परिस्थितीच्या ताज्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, भारतातील तिसऱ्या लाटेचा उच्चांक 23 जानेवारी रोजी दिसून येईल मात्र, दैनंदिन कोरोनारुग्णांची संख्या चार लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता नाही. कोविड ट्रॅकरच्या सूत्र मॉडेलने सांगितले की, &nbsp;मुंबई आणि दिल्लीने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आहे.</p>

from maharashtra https://ift.tt/3Kty42U
via IFTTT

Post a Comment

0 Comments