Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates: राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू; प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

<p style="text-align: justify;"><strong>Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates:</strong> राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये &nbsp;निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असून, प्रचाराचा धुरळा उडलाय. 18 डिसेंबरला मतदान, तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.&nbsp;</p> <p style="text-align: justify;"><strong>Pandharpur Gram Panchayat Election: वेळापूर ग्रामपंचायत रिंगणात तृतीयपंथी उतरल्याने रंगत वाढली&nbsp;</strong></p> <p style="text-align: justify;"><strong>Pandharpur Gram Panchayat Election:</strong> माळशिरस तालुक्यातील वेळापूर हि सर्वात मोठी ग्रामपंचायत असून येथे राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांची सत्ता आहे . याच ग्रामपंचायत मधून सरपंचपदासाठी जनतेचा उमेदवार म्हणून तृतियपंथीय माया उर्फ सदाशिव रामचंद्र अडसूळ हे निवडणूक रिंगणात उतरल्याने रंगतदार प्रचार सुरु असून माया याने आपला जाहीरनामा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करून जनतेत मते मागत फिरत आहे . या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी काट्याची टक्कर सुरु असताना मायाच्या उमेदवारीने वेळापूर सरपंचपदासाठी चुरस वाढल्याचे चित्र आहे .</p> <p style="text-align: justify;"><strong>Osmanabad Gram Panchayat Election:</strong> उस्मानाबाद जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक अवघ्या काही तासांवर आली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सध्या मेड इन चायना ईव्हीएम मशीन दाखल झाल्या असून.. मशीन होतकरू इच्छुक उमेदवार विकत घेताय गावागावात जाऊन सरपंच पदासाठी कोणाला निवडून द्यायचं वॉर्डातल्या कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं हे दाखवत आहे यासोबतच या वेळेस सरपंच पदाची निवड थेट जनतेतून असल्यामुळे कमालीची चुरस वाढली आहे मोबाईल म्हणजेच इंटरनेटच्या पेनेत्रेशन मूळ निवडणुकीच्या संदर्भात बदलून गेले व्हाट्सअप स्टेटस ठेवून उमेदवार आपला प्रचार करत आहेत वेगवेगळी साहित्य सुद्धा बाजारात आलेत पण खरी गंमत आहे ती मेड इन चायना ईव्हीएम डमी मशीनची.</p> <p style="text-align: justify;"><strong>Beed Gram Panchayat Election:</strong> बीडच्या क्षीरसागर कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या नवगण राजुरी मध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकी च्या प्रचाराचा धुमाकूळ पाहायला मिळतोय.. राजुरी ग्रामपंचायत साठी येथे 18 तारखेला मतदान होणार आहे एकूण 13 सदस्य आणि एक सरपंच अशा 14 जागेसाठी ही थेट लढत होणार आहे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाच्या समोर जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे आव्हान असणार आहे..&nbsp;</p> <p style="text-align: justify;">या ग्रामपंचायत वर सध्या आमदार संदीप क्षीरसागर गटाचे वर्चस्व आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये राजुरी ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर गटाच्या ताब्यात राहते की जय दत्त श्री सागर गट आपल्या ताब्यात घेते हे पाहणं मोठे असल्याचे ठरणार आहे याच ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा आढावा घेतला</p>

source https://marathi.abplive.com/elections/maharashtra-gram-panchayat-election-2022-live-updates-latest-news-of-gram-panchayats-elections-maharashtra-gram-panchayats-election-across-34-districts-in-maharashtra-1130948

Post a Comment

0 Comments